प्रशासन आणि राजकीय मंडळी ही रथाची दोन चाके आहेत. एक जरी खराब असेल तर संघर्ष होतो, कामे व्हायला थोडा त्रास होतो. पण इथले अधिकारी सकारात्मक मानसिकतेचे आहेत, अशा शब्दात आमदार सुहास बाबर यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यालयीन कामकाज मोहिमे अंतर्गत विट्यात महसूल विभागातर्फे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय तसेच दुर्लक्षित घटकांना जातीचे दाखले देण्यात आले.
या दाखल्यांचे वाटप आ. सुहास बाबर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, नायब तहसीलदार अभिजीत हजारे यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. आम. बाबर म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या मंडळींना शासनामार्फत दाखला देऊन अधिकृत केले जात आहे. यात अनेक दुर्लक्षित घटक आहेत जे रोज कामावर जातात.मजुरी, रोजंदारी किंवा काम उद्योग केल्याशिवाय त्यांना दोन वेळचे अन्न मिळत नाही. यातील किती मंडळी शाळेत गेली असतील ? कुणास ठाऊक. पण त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम महसूल विभागाने केले.
या दाखल्यांमुळे मोठा फायदा या लोकांना मिळणार आहे. गेल्या अठरा वर्षाच्या राजकारणात एक गोष्ट शिकलो की, सकारात्मक मानसिकतेचे अधिकारी असले की कामे चांगली होतात. प्रशासन आणि राजकीय मंडळी ही रथाची दोन चाके आहेत एक जरी चाक खराब असेल तर संघर्ष होतो. कामे व्हायला थोडा त्रास होतो. पण आपण सगळे युवक आहातच पण सकारात्मक मानसिकतेचेही आहात. तुम्ही चांगले केले तर त्याचे श्रेय तुम्हाला मिळते. पण तुम्ही वाईट केले तर त्याचे मात्र खापर आमच्या माथ्यावर फोडले जाते. तुमचे फिक्स आहे. पण आमचे तसे नाही. या पाच वर्षात आम्ही कसे काम करतो, त्यावर आमचे पुढचे भवितव्य अवलंबून असते. त्यामुळे केवळ हे १०० दिवसच नाही, तर कायमच चांगले काम करा अशी अपेक्षाही आम. बाबर यांनी बोलून