पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड गरजेची आहे. स्वतंत्रपूर(Swatantrapur) खुल्या वसाहतीतील कैदी बांधवानी या हरित मोहिमेतून समाजाशी नव्याने नाळ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमामुळे आटपाडी तालुक्याला हिरवाईची नवी ओळख मिळेल , अशा शब्दांत जात विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी समाधान व्यक्त केले.
आटपाडी तालुक्यातील स्वतंत्रपूर खुल्या वसाहतीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नारळ व बांबूच्या रोपांची लागवड करून आमदार पडळकर यांच्या हस्ते या हरित मोहिमेचा प्रारंभ झाला. वसाहतीतील ५४ एकर क्षेत्र वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभाग व तुरुंग अधिकारी मधुकर चौधरी यांच्या संकल्पातून तब्बल १६ हजार झाडांची लागवड येथे होत आहे, आंबा , नारळ, चिंच, पिंपळ , कडुलिंब , बांबू यांसारखी उपयुक्त झाडे लावून परिसराला हिरवाईचे वरदान मिळणार आहे.
