विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात तिसरी आघाडी! रविकांत तुपकर मैदानात शेतकऱ्यांचे प्रश्न हे निवडणुकीच्या केंद्रस्थानी यावे यासाठी राज्यात तिसरी सध्या आघाडीच्या पर्यायाचा विचार केला जात आहे. यासाठी बच्चू कडू, संभाजी राजे व रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. याच पार्शवभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर हे 11 जुलै पासून महाराष्ट्र दौऱ्यावर  निघत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर रिंगणात उतरत असतांना सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून हिणवणे योग्य नाही, याचा अर्थ प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही मैदानात उतारायचेच नाही का ? असा सवाल तुपकर यांनी टीकाकारांना विचारला आहे