कधीकाळी कुपोषित बालकांचा जिल्हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा प्रदेश ओळखला जात. मात्र, नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार कुपोषित बालकांच्या संख्येत महानगरांमध्येच वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यात कुपोषित बालकांची आकडेवारी चिंताजनक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तब्बल 1 लाख 82 हजार 443 बालकं कुपोषित असल्याची सरकारची आकडेवारी असून सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या आकडेवारीतून समोर आलं आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 1 लाख 51 हजार 643 असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 एवढी आहे. पुण्यातही कुपोषित बालकांची संख्या चिंताजनक असल्याचं चित्र आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ झाली असून मुंबई उपनगरमध्ये 16 हजार 344 कुपोषित बालके आहेत. त्यात, मध्यम कुपोषित बालकांची संख्या 13,457 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 2887 एवढी आहे. राज्यामध्ये मध्यम कुपोषित बालकांची संख्या 1 लाख 51 हजार 643 असून तीव्र कुपोषित बालकांची संख्या 30,800 एवढी आहे. मुंबई उपनगराच्या पाठोपाठ नाशिक जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्या वाढली. नाशिक मध्ये 9 हजार 852 कुपोषित बालकांची संख्या असून यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 8,944 तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या 1852 एवढी आहे.
ठाणे जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 7,366 आणि तीव्र कुपोषित बालकांची संख्या 844 एवढी आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील कुपोषित बालकांची पुण्यातील संख्या कमी आहे. पुण्यात मध्यम कुपोषित बालके 7,410 तर तीव्र कुपोषित बालके 1666 एवढी आहेत.
धुळे जिल्हा मध्यम कुपोषित बालके 6,377 आणि तीव्र कुपोषित बालके 1741 आहेत. छत्रपती संभाजी नगर जिल्हा मध्यम कुपोषित बालके 6487 तर तीव्र कुपोषित बालके 1439 आहेत. नागपूर मध्यम कुपोषित बालके 6,715 तर तीव्र कुपोषित बालके 1373 एवढी आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या योजना आणि होणारा खर्च यावरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही आकडेवारीतून समोर येत आहे.