लढायचं की पाडायचं? जरांगे पाटील ‘या’ तारखेला घेणार निर्णय

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशात मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत सतत चर्चा होत आहेत. अता अशात निवडणूक लढवायची की सत्ताधाऱ्यांचे आमदार पाडायचे याबाबतचा निर्णय 20 तारखेला होणार आहे.या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाची भूमिका काय असणार याचा निर्णय घेण्यासाठी जरांगे पाटील यांनी 20 ऑक्टोंबरला समाजाची बैठक आयोजित केली आहे. यावेळी समाजातील जे कोणी निवडणूक लढवण्यासाठी उत्सक आहेत, त्यांनाही जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीला बोलावले आहे.