महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी कागदपत्रे व संपूर्ण माहिती

महिलांसाठी अनेक नवनवीन योजना सरकार देत आहे. तर आता महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे. तर त्यासाठी अर्ज कोठे करायचा पात्रता काय आहे याविषयीची सविस्तर माहिती देणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे

  • अर्जदार ही 12 वी शिकलेली असल्याचा पुरावा
  • अर्जदार महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत
  • घराचा 8अ उतारा
  • उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार) लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख 20 हजार पेक्षा कमी असल्याचा पुरावा
  • बँक पासबुक ची पहिला पानाची झेरॉक्स
  • लाईट बिलची झेरॉक्स

या महिलांना मिळणार लाभ

  1. मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळत आहे, शासनाने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवली जात आहे, त्यामुळे हा लाभ फक्त महिलांनाच घेता येत आहे.
  2. अर्जदाराच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे, त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास हा लाभ मिळणार नाही.
  3. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना मोफत पीठ गिरणी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो, या योजनेसाठी आवश्यक त्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे आहे.

या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा

  • तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवा तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल
  • त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.

मोफत पिठाची गिरणी बघा संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा

  1. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
  2. सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
  3. अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
  4. या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.

नियम व अटी

  1. लाभार्थीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे किंवा 60 वर्षापेक्षा कमी असावे.
  2. वरील सर्व अटीचे पूर्तता करूनच पात्र अर्ज सादर करावे अपात्र अर्ज सादर करण्यात येऊ नये.
  3. सदर योजनेमधील लाभार्थी निवडी बाबतचा अधिकार समाज कल्याण विषय समितीला राहील.
  4. जिल्हा परिषद पंचायत समिती अंतर्गत मागील 03 वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री मास्टर
  5. नोंदवही वरून करून अर्ज पंचायत समिती कडे सादर करण्यात यावेत.