वाळवा ग्रामपंचायतीचे कचऱ्यापासून भरावाचे काम सुरू

वाळवा ग्रामपंचायतीने पावसाळ गटार स्वच्छता मोहीम सुरू केली आहे यामध्ये गटारीतून निघणारा कचरा मैला कचरा हा रस्त्याच्या भरावाकार्म वापरला जात असल्याचे लोकनियुक्त सरपंच संदेश कांबळे यांनी सांगितले यावेळी उपसरपंच हर्षवर्धन पाटील ग्रामसेवक तात्यासाहेब जरग उपस्थित होते. कंत्राटी कामगारांच्या मदतीने गावातील सर्व गटारींची स्वच्छत मोहीम सुरू आहे. गटारी स्वच्छ होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

१२ ते १५ कर्मचारी गटारीतील मैला काढून ट्रॉलीमध्य भरून गावांत रस्ता काम सुरू आहे तिथे भराव म्हणून हा टाकत आहेत पावसाळ्यात गटारीतील घाण काढल नाही तर गटारी तुंबून पाणी रस्त्याव येते म्हणून काळजी घेतली आहे वाळवा ग्रामपंचायतीने हा अनोख प्रयोग वापरात आणला आहे. गटारीतून निघणारा मैला तसेच प्लास्टिक कचऱ्याचा भराव रस्त्याव भरण्यासाठी उपयुक्त आहे हे हेरून त टाकण्यास सुरुवात केली आहे.

त्यामुळे गटारी साफ होत आहे. सरपंच संदेश कांबळे म्हणाले वाळव्यातील माळभाग, पेठभाग हाळभाग, कोटभाग येथील गटारींची स्वच्छता सुरू आहे .ग्रामपंचायत सदस्य मिलिंद थोरात कर्मचारी रमेश जाधव, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांचे देखरेखीखाली काम युद्धपातळीवर सुरू आहे घर त्याचा निश्चितच गावकऱ्यांन फायदा होईल.