तिरुपती देवस्थानच्या चरबीयुक्त लाडू वादात सुप्रीम कोर्टाचा अखेर मोठा निर्णय

 तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याच्या प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने तपासासाठी स्वतंत्र समिती (एसआयटी) स्थापन करण्यास सांगितले आहे. सीबीआय आणि राज्य पोलिसांचे प्रत्येकी 2 अधिकारी आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) चा एक अधिकारी असेल. तपासावर सीबीआय संचालक देखरेख ठेवतील. 1 ऑक्टोबर रोजी आंध्र पोलिसांनी या प्रकरणाचा एसआयटी तपास थांबवला होता. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू असल्याचे डीजीपी म्हणाले होते. न्यायालयाच्या सूचनेनुसार एसआयटी तपासाला पुढे जायचे की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर तिरुपती मंदिरातील लाडूंच्या भेसळीच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, राज्य सरकारच्या वतीने मुकुल रोहतगी, तिरुपती मंदिराच्या वतीने सिद्धार्थ लुथरा आणि तिरुपती तिरुमला देवस्थानम (TTD) चे माजी अध्यक्ष वायवी सुब्बारेड्डी यांच्या वतीने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला.