विट्याच्या चारही वाड्यात सुहास बाबर यांचाच बोलबाला….

विटा येथे नुकताच टेंभु क्रमांक सहाचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात विटा उपनगरामधील चारही वाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे. टेंभू टप्पा क्रमांक सहा मधून पाणी मिळणार आहे यापूर्वीच उपनगरातील वाड्यांमध्ये पाणी पोहोचल्याने शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.

या वाड्यांमधून लाखो टन ऊस उत्पादन घेतले जात असून शेतकरी वर्गाचा आर्थिक स्तर सुधारन्यात आल्याने शेतकरी मेळाव्यास भरघोस असा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. सूर्यनगर, गांधीनगर येथील शेतकऱ्यांनी हलगी टीमक्याच्या गजरातच मंडपात प्रवेश केला. या गर्दीमध्ये सुहास बाबर यांचा विजय असो अशा घोषणा देण्यात येत होत्या.