महाराष्ट्रात पालकमंत्री पदावरुन दंगल सुरु आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरुन त्या जिल्ह्यात रस्त्यावर उतरुन लोकांनी दंगल करणं. टायर जाळणं, धमक्या देणं, तटकरेंविरोधात घोषणा देणं. नाशिकच्या बाबतीतही तेच घडलं. बीडच्या पालकमंत्री पदाबाबतही तसाच घोळ आहे. महाराष्ट्रात यांना जे बहुमत मिळालय त्याचा हे अनादर करतायत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस पालकमंत्रीपदाची घोषणा करुन उदय सामंत यांच्यासोबत परदेशात गेले. एकनाथ शिंदे यांची नाराजी त्या संदर्भात आहे.
एकनाथ शिंदे यांची खरी नाराजी त्या संदर्भात आहे. पालकमंत्रीपद हे निमित्त आहे. इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री, भाजपच स्वत:च बहुमत आहे, तरीही ते आपल्याच पालकमंत्रीपदाबाबतच्या निर्णयांना स्थगिती देतात, हे आश्चर्य आहे असं संजय राऊत म्हणाले.पालकमंत्री पदावरुन जी दंगल सुरु आहे, ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी आहे.
नाशिकमध्ये कुंभेळ्याच फार मोठं बजेट आहे. रायगडचे व्यवहार सगळ्यांना माहीत आहेत, सधन जिल्हा आहे. उद्योग, इंडस्ट्री आहे. त्यांना छळून जास्तीत जास्त खंड्ण्या कशा गोळा करता येतील, असाच एक हिशोब तिकडे नेहमी असतो. आर्थिक देवाण-घेवाणीतून या सर्व मारामाऱ्या सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री पदाच्या निर्णयांना स्थगिती देऊन मी लाचार, हतबल मुख्यमंत्री आहे, हे दाखवून दिलय अशी टीका संजय राऊत यांनी केली.