देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा शंखनाद झाला असून एकून ७ टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली आहे.
आम्ही निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे. निवडणुकीत 97 कोटी मतदार मतदान करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात एकूण 10.5 लाख मतदान केंद्र असतील तर 55 लाख ईव्हीएमचा वापर केला जाणार आहे.