आजपासून कोल्हापूर जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस…

सध्या पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग देखील सुरू आहे. कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असली, तरी धरण क्षेत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने धरणांच्या पाण्यात वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असल्याने 28 कोल्हापुरी बंधारे पाण्याखाली गेले आहेत.राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

आज शुक्रवार 5 जुलै सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, जांबरे मध्यम प्रकल्प आज पहाटे 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. दुसरीकडे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दडी मारल्यानंतर उत्तरार्धात आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नदी आणि धरणांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखालीपंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळवारणा नदी- चिंचोलीभोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे,कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोलीघटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडीहिरण्यकेशी नदी – साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर व माणगावदुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली