छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात धुळे-सोलापूर महामार्गावर माळीवाडा-फतियाबाद परिसरात भीषण अपघात झाला आहे. यामध्ये स्विफ्ट डिझायर कारने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
दरम्यान अपघातत मृत्यूमुखी पडलेले तिघेही बजाज नगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे. हे तिन्ही पीडित कन्नडवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झाला आहे. अलकाबाई राजू उचित, राजू आत्माराम उचित आणि अर्जुन राजू उचित या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे.