मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण

सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत .सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा.  हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख करा. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे, अशा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत.