१४ ऑगस्टपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी ६ ते दिनांक १४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) अ ते फ आणि कलम ३७ (३) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.