श्रीकृष्ण जन्माष्टमीला शाळा, शेअर बाजार सुरु राहणार की बंद? जाणून घ्या…

उद्या म्हणजेच 26 ऑगस्टला सर्वत्र जन्माष्टमी तर 27 ऑगस्टला दहीहंडी साजरी केली जाईल.हिंदू धर्मातील श्रीकृष्ण जन्माष्टमी हा महत्वाचा सण असून हा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. उत्तर प्रदेशात विशेषत: मथुरेत जिथे श्रीकृष्णाचा जन्म झाला तिथे मोठा उत्सव पाहायला मिळतो. अशावेळी भारतातील शाळा, महाविद्यालये सुरु राहणार की बंद? अशा प्रश्न अनेकांना पडला आहेत.

जन्माष्टमीचीच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, तर या दिवशी काही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुट्टी देखील असते. यावर्षी जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त 26 आणि 27 ऑगस्ट या दोन्ही दिवशी येत आहे. त्यामुळे तुमच्या शाळेत जन्माष्टमीची सुट्टी कधी आहे याबद्दल शाळेच्या शिक्षकांकडून खात्री करुन घ्या. विद्यार्थ्यांच्या शालेय डायरीमध्ये याची माहिती दिलेली असते.

दरम्यान उत्तर प्रदेशातील शाळा 26 ऑगस्टलाच बंद राहतील. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी भुनेश्वर, अहमदाबाद, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, जयपूर, जम्मू, हैदराबाद, कानपूर, कोलकाता, लखनौ, पाटणा, रायपूर, रांची, शिलाँग, शिमला,श्रीनगर आदी ठिकाणी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असेल. त्यामुळे येथील शाळा बंद राहतील. तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी सुट्टी नसेल. यावेळी 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी आहे. याच दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्याच्या यादीनुसार या सणानिमित्त देशात वेगवेगळ्या ठिकाणी 26 ऑगस्ट रोजी बँका बंद असतील. तर काही भागात बँका चालू राहतील.मुंबई शेअर बाजार म्हणजेच BSE च्या अधिकृत संकेतस्थळानुसार राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) आणि  मुंबई शेअर बाजार(BSE) जन्माष्टमीच्या दिवशी (26 ऑगस्ट) चालू राहील. याबाबतची अधिकृत माहिती बीएसईच्या संकेतस्थळावर अपलब्ध आहे.

यामध्ये आगरतळा, बेलापूर, बेळगाव, बेंगळुरू, गुवाहाटी, भोपाळ, इंफाळ, इटानगर, कोची, कोहिमा, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, तिरुअनंतपुरम, पणजी या ठिकाणांचा समावेश आहे. काही ठिकाणी शाळा व्यवस्थापन सुट्टी देण्याबाबतचा निर्णयही घेऊ शकते. तेथे शाळा सुरू राहतील. यापैकी काही शहरांमध्ये जन्माष्टमीलाही शाळा बंद राहतात. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोमवारी अनेक राज्यातील बँकांसह अनेक सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे. याआधी शनिवार आणि रविवारीही बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये सलग तीन दिवस सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत.