हातकणंगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा…..

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढला पंचायत समिती पासून मोर्चाला सुरुवात झाली. मूक मोर्चामध्ये निलेवाडी पारगावसह पूरबाधित स्त्री पुरुषांचा सहभाग होता .मोर्चा तहसील कार्यालय समोर येऊन थांबला तहसीलदार निवेदन स्वीकारण्यासाठी बाहेर येत नसल्यामुळे मोर्चा करांनी तहसील कार्यालय समोर या आंदोलन चालू केले आणि त्यांनी या ठिकाणी भाषणे केली व थोड्यावेळाने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. गेल्या तीन वर्षात तिन्ही सालामध्ये ज्यांचे शेतीचे महापुरामुळे नुकसान झाले आहे .तसेच ज्यांच्या घरांमध्ये महापुराचे पाणी शिरून नुकसान होत आहे .तसेच पिके बाधित झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना लगेच भरपाई द्यावी अशा मागण्या केल्या आहेत. तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठांकडे पाठवतो असे आश्वासन दिले आहे.