सांगोल्याच्या अतिविराट सभेत उद्धवसाहेब ठाकरे यांचे जनतेला अभिवचन

सांगोला येथील या अतिविराट आणि रेकॉर्ड ब्रेक सभेला उद्देशून बोलताना उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करत नाही. इथल्या गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला. पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलं. सांगोला तालुक्यातील सुजान जनता याच गद्दारांना २३ तारखेला रायगडचे टकमक टोक दाखवेल असेही यावेळी उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले. गद्दारांच्या छताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे. येत्या २३ तारखेला सांगोल्याची जनता गद्दाराचा कडेलोट करेल आणि 24 तास जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखा सैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्त करताना खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर एकाची पैशाची गाडी सापडली होती, त्यात २५ कोटी होते पण ५ कोटी रुपये दाखवले. सांगोला तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे ती कदापी विकली जाणार नाही. स्वाभिमानी सांगोलकर २० नोव्हेंबर रोजी मशालीचे बटन दाबून नक्कीच दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करतील आणि शहाजीबापू पाटील यांना कायमस्वरुपी घरी बसावतील असा विश्वासही शेवटी उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, साईनाथभाऊ अभंगराव,शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, तुषार इंगळे, चंद्रकांत करांडे, चंद्रकांत चौगुले, शिवाजीनाना बनकर, नवनाथ मोरे, अजित देवकते, रणजीत बागल, मंगेश मस्के,रवींद्र कांबळे आदीसह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना शहाजीबापू पाटील यांच्यावर तोफ डागली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, रणजित बागल, तानाजीकाका पाटील, शिवसेना जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहर प्रमुख तुषार इंगळे, अनिलनाना खटकाळे, योगेश खटकाळे, शिवाजीनाना बनकर, सूर्यकांत घाडगे, नवनाथ मोरे, विनोद रणदिवे, सूर्याजी खटकाळे, भारत गवळी, मधुकर बनसोडे, नितीन रणदिवे, अनिल खडतरे, विजयदादा येलपले, जयमाला गायकवाड, दिलीप मोटे, अनिल मोटे, यशराजे साळुंखे पाटील, डॉ. धनजंय पवार, शाहूराजे मेटकरी, राजेंद्र देशमुख, बिरा पुकळे, शिवाजी जावीर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तब्बल ५० हजारहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.