इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न हा जगजाहीर आहे. पाण्याची तीव्र टंचाई शहरात जाणवते. सतत होणाऱ्या गळती, पंचगंगा प्रदूषण अशा अनेक कारणामुळे शहरवासीयांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. माजी आमदार प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी कृष्णा ‘योजना बळकटीकरणासह मजरेवाडी व पंचगंगा कट्टीमोळा येथील मशिनरी बदलण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून शासन दरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून ६.४२ कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये ट्रान्सफार्मर व व्हर्टीकल टर्बाइन पंप बसविणेसाठी ४.३९ कोटी, मजरेवाडी येथे उच्चदाब केबल व सीसीटिव्हीसाठी ७७.२४ लाख, नवीन पंपहाऊसमध्ये बसबार, विद्युत व्यवस्था व ईवोटी क्रेनसाठी ८९.९६ लाख आणि कट्टमोळा येथे सीसीटिव्ही केबल व विद्युत व्यवस्थेसाठी ३५.१७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. ही कामे गतीने पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे शहराला सातत्याने भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.