कच्च्या आंब्यामध्ये (raw mangoes) व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.उन्हाळ्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे उष्माघात. कच्चे आंबे शरीराला थंडावा देतात आणि डिहायड्रेशन टाळतात. गोड आणि आंबट आंब्यापासून बनवलेलं पन्ह शरीर थंड ठेवतं आणि उष्माघातापासून वाचवतं.
कच्चे आंबे पचनसंस्था मजबूत करण्यास मदत करतात. त्यात फायबर आणि पेक्टिन असते – जे बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनापासून आराम देते. जर तुम्ही जेवणापूर्वी थोडा कच्चा आंबा (raw mangoes) मीठ आणि काळी मिरीसह खाल्ला तर पचन सुधारते आणि भूक देखील वाढते.कच्चे आंबे यकृतासाठी खूप फायदेशीर असतात. हे यकृताला विषमुक्त करते आणि पित्त स्राव नियंत्रित करते. यामुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि यकृताचे कार्य चांगले होते.
कच्या आंब्यांमधील अँटीऑक्सिडंट-जीवनसत्त्वे त्वचेला चमक देतात आणि केस मजबूत करतात. हे शरीरातील विषारी द्रव्य काढून टाकते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते आणि केस गळण्याची समस्या कमी होते.