मुंबईत २० जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. त्यामुळे आता मुंबईत नेमकं कसं यायचं? मार्ग काय? याचा प्लॅन काय हेच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. तब्बल ३ कोटी मराठे मुंबईत येतील असा दावा करत आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कात उपोषण करू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीपासून मुंबईकडे जाण्याचा मार्ग निश्चित होणार आहे. मिळेल त्या वाहनाने या, आंदोलन काळात पुरतील तेवढ्या वस्तू सोबत ठेवा, असं आवाहन करत सोबत काय काय घ्यायचं हे सांगितले जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांनी तीनदा आतापर्यंत उपोषण केलं. पहिल्यांदा पोलिसांचा लाठीचार्ज झाला. त्यानंतर सरकारने दोनदा शिष्टमंडळ पाठवून मुदत घेतली. आता २४ डिसेंबरचा अल्टिमेटम संपलाय. त्यामुळं मुंबईत शेवटचं आंदोलन असेल असंही जरांगे पाटील म्हणाले.
Related Posts
Sharad Pawar: शरद पवार गटाचं ठरलं? ‘इतक्या’ जागांवर लढण्याची तयारी सुरु
विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षामध्ये जागावाटपाची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पुरातन रूप समोर! २ जूनपासून……
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सध्या संवर्धनाचं काम सुरू आहे. मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्याने…
कोल्हापूरकरांचे पुन्हा वाढले टेन्शन! धरणाचे सर्व दरवाजे उघडले…..
चार दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या…