हार्दिक पंड्याने सामना संपल्यावर खरं ते सांगितलंच ….

मुंबई इंडियन्सचा पंजाब किंग्सने पराभव केला. पण मुंबईचा हा पराभव नेमका का झाला , हे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सामना संपल्यावर सांगितले.

मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर होता आणि त्यामुळेच ते प्ले ऑफमध्ये पोहोचले होते. प्ले ऑफचा पहिला एलिमिनेटरचा सामना हा गुजरात टायन्सबरोबर झाला. मुंबई इंडियन्सने या सामन्यात गुजरातचा अखेरच्या सामन्यात पराभव केला होता आणि त्यामुळेच ते क्वालिफायर २ या सामन्यात पोहोचले होते. या सामन्यात त्यांचा सामना हा पंजाब किंग्सबरोबर झाला. पाऊस पडला होता, त्यामुळे मुंबईचा संघ जास्त धावा करेल, असे वाटत नव्हते. पण मुंबईच्या फलंदाजांनी आपली गुणवत्ता पणाला लावली आणि त्यामुळेच त्यांना दोनशे धावांचा पल्ला ओलांडता आला होता. पण श्रेयस अय्यर नाबाद ८७ धावांची खेळी साककारल्यामुळे पंजाबला मुंबईवर विजय मिळवता आला.

हा सामना संपल्यावर हार्दिक पंड्या म्हणाला की, ” हार्दिक पंड्या म्हणाला की, पावसानंतर आम्ही मैदानात आलो, पण त्यानंतरही आम्ही दमदार फलंदाजी केली. माझ्यामते दोनशे धावा या सामन्यासाठी पुरेश्या होत्या. कारण या सामन्यात जास्त दडपण असते आणि एवढ्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करणे सोपे नसते. पण त्याचवेळी श्रेयस अय्यर मुंबईच्या विजयाच्या मार्गात आला. श्रेयस अय्यरने अप्रतिम फलंदाजी केली. श्रेयसने या सामन्यात जोखीम पत्करली आणि त्याचा त्याला फायदा मिळाला. श्रेयस या सामन्यात मोठे फटके मारायला विसरला नाही आणि त्याच्यामुळेच आमचा पराभव झाला. “

मुंबई इंडियन्ससाठी हा करो या मरो असा सामना होता. कारण हा सामना गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येणार होते. त्यामुळे मुंबईचे खेळाडू या सामन्यात जीव ओतून कामगिरी करत होते. फलंदाजी तर त्यांनी चांगली केली होती. पण त्यांना गोलंदाजीत लय सापडत नव्हती. कारण पंजाबचा संघ आक्रमण करायचे काही सोडत नव्हता. मुंबईने पंजाबला एकामागून एक तीन धक्के दिले खरे, पण त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि नेहाल वधेरा यांनी दमदार फलंदाजी केली. त्यामुळे मुंबईचे आव्हान धोक्यात आले होते.