सोलापुरात 29 वर्षानंतर पाच जानेवारीपासून रंगणार पार्क स्टेडियम वर रणजीचा थरार!

सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर पाच ते आठ जानेवारी या काळात महाराष्ट्र विरुद्ध मनिपुर संघात चार दिवसीय रणजी सामना होणार आहे. तब्बल 29 वर्षानंतर पार्क स्टेडियमवर रणजीचा सामना खेळला जाणार आहे.

हा सामना पाहण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी क्रीडा शिक्षक खेळाडूंनी हा सामना पाहण्यासाठी यावे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना तशी सोय करून द्यावी असे पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी शाळांना पाठविले आहे.

पुरुषांच्या वरिष्ठ गटाच्या चार दिवसीय रणजी करंडकाला 5 जानेवारीपासून देशात विविध ठिकाणी सुरुवात होत आहे. महाराष्ट्र संघाचा सामना मणिपूर संघासमवेत होणार आहे. या दोन्ही संघाचा रणजी ट्रॉफीसाठी इलाईट ए गटात समावेश असून झारखंड, सौराष्ट्र, सेना दल, हरियाणा, राजस्थान, विदर्भ हे संघ देखील याच गटात असणार आहेत.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने या सामन्यांचे आयोजन सोलापूर येथे होणार आहे.