राजगीर, भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये प्रवेश केला आहे. रविवारी संघाने जपानवर ३-२ असा विजय मिळवला. या विजयामुळे टीम इंडिया पूल अ पॉइंट्स टेबलमध्ये नंबर-१ वर पोहोचली.
राजगीर येथील बिहार स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी हॉकी स्टेडियमवर मनदीप सिंगच्या गोलमुळे भारताने आघाडी घेतली. तिसऱ्या मिनिटाला त्याने मैदानी गोल केला. त्यानंतर पाचव्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून गोल करून भारताला(India) २-० अशी आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमपर्यंत हीच स्कोअर लाईन होती.
तिसऱ्या क्वार्टरमध्ये, जपानने कवाबे कोसेईच्या गोलने पुनरागमन केले. कोसेईने बॅक हँड शॉट मारला आणि चेंडू गोलपोस्टच्या आत ढकलला. चौथ्या क्वार्टरच्या अगदी आधी, भारतीय(India) कर्णधार हरमनप्रीत सिंग ने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. हा हरमनप्रीतचा दूसरा आणि भारतीय संघाचा तिसरा गोल होता. शेवटच्या शिट्टीच्या अगदी आधी, जपानच्या कवाबे कोसेईने (५८ व्या मिनिटाला ) त्याचा आणि संघाचा दुसरा गोल केला. तथापि, तो त्याच्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
