एक केळं खाऊन त्यानंतर चार ग्लास पाणी प्यायल्याने आम्लपित्त म्हणजेच अॅसिडीटी लगेच बरे होते असा दावा करणारा एक व्हायरल हॅक आहे. पण ते खरं आहे का ? अॅसिडीटी का होते ? आम्लपित्त सामान्यतः तेव्हा होते जेव्हा पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत जाते. हे जास्त मसालेदार किंवा तेलकट अन्न खाणे, जेवण वगळणे, जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा अगदी ताणतणावामुळे होऊ शकते. सामान्य लक्षणांमध्ये छातीत जळजळ होणे, पोट फुगणं किंवा तोंडाला आंबट चव येणे यांचा समावेश आहे. पण हा उपाय प्रभावी आहे का? यामुळेच नक्की आराम मिळू शकतो, पण तो प्रत्येकासाठी जादूचा उपाय नाही. केळी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असतात आणि पोटासाठी सौम्य असतात. ते पोटाच्या अस्तरांना शांत करण्यास आणि आम्ल कमी करण्यास मदत करू शकतात. पाणी पिण्यामुळे पोटातील आम्ल तात्पुरते पातळ होऊ शकते.
म्हणून, सौम्य आम्लतेसाठी, हे मिश्रण काही प्रमाणात आराम देऊ शकते. मग ते प्रत्येकासाठी का काम करत नाही? कारण प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत असतं. काहींसाठी एकाच वेळी जास्त पाणी पिण्यामुळे पोटफुगी होऊ शकते किंवा लक्षणं आणखी बिघडू शकतात. केळी बहुतेकांसाठी सुरक्षित असली तरी, काही लोकांना ते गॅस तयार करणारे वाटू शकतात. तसेच जर आम्लता वारंवार होत असेल किंवा आम्ल रिफ्लक्स किंवा अल्सरसारख्या खोलवरच्या समस्यांमुळे उद्भवत असेल, तर हा सोपा उपाय पुरेसा नाही. हे करून पाहणं हानिकारक आहे का? तर नाही पण संयम महत्त्वाचा आहे.”एक केळ आणि 1-2 ग्लास पाणी ठीक आहे. पण एकाच वेळी चार मोठे ग्लास पाणी पिणं पोट ताणू शकतं आणि अस्वस्थता निर्माण करू शकतं. विशेषतः जर तुम्हाला आधीच पोट फुगल्यासारखं वाटत असेल,” असं तज्ज्ञ सांगतात. अॅसिडिटी मॅनेज करण्यासाठी लोकांनी खरोखर काय करावे? कमी प्रमाणात, अधिक वेळा जेवण घ्या. जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा. मसालेदार, तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ मर्यादित करा. दिवसभर हायड्रेटेड रहा.
