मनोज जरांगे यांचे उपोषण २६ जानेवारीपासून नाही तर….

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघणार आहेत. मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवली सराटीपासून म्हणजेच आजपासून आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आपण आहोत.

त्यासंदर्भात समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. समाजातील सर्वांना विश्वासात घेऊन मी निर्णय घेणार आहे. समाजाला विचारुन मी आजच हा निर्णय जाहीर करणार आहे. आता समाजासाठी जीव अर्पण करायचे आहे. मराठयांसाठी टोकाचे पाऊल उचलणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील आज मुंबईकडे निघणार आहे. यामुळे अंतरवली सराटीच्या मुख्य रस्त्यावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आंदोलक जिथून बाहेर पडणार त्या ठिकाणी लावले बॅरिकेट लावण्यात आले आहे. मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते भावूक झाले होते.

त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. आता छातीवर गोळ्या लागल्या तरी माघार नाही. समाजासाठी मी बलिदान देण्यास तयार आहे. उपोषण २६ जानेवारीपासून करायचे होते. त्यापेक्षा आजच का करु नये? हा विचार मी केला आहे. याबाबत समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे.