सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. तसेच पाऊस हा वेळेवर न पडल्याने देखील शेतकरी अडचण येत आहे. पाण्याअभावी सोलापूर जिल्हा हा दुष्काळी भाग सगळीकडे प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्यातील धरणातून सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात १० टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी युवा सेनेच्यावतीने आज सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथे रास्तारोको आंदोलन केले.या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
ऐन उन्हाळ्यात सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागणार आहे. शिवाय शेतीच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होणार आहे. पाणी टंचाई कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील धरणातून १० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश इंगळे यांनी केली आहे. याबाबत अद्याप निर्णय घेतला जात नसल्याने युवा सेनेने आंदोलन छेडले आहे.
दरम्यान सोलापूर- पुणे महामार्गावर आज रास्तारोको आंदोलन करण्यात आले असून सरकारने पाणी सोडण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन केले जाईल; असा इशारा ही यावेळी आंदोलक शेतकर्यांनी दिला आहे. रास्तारोको आंदोलनामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.