सोलापूर जिल्ह्यातील ५.७६ लाख कुटुंबांना मिळणार घरोघरी नळ कनेक्शन

केंद्र सरकारच्या ‘हर घर जल नळ’अंतर्गत जलजीवन मिशनमधून ग्रामीण भागातील सोलापूर जिल्ह्यातील तब्बल पावणेसहा लाख कुटुंबांना स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी नळ कनेक्शन दिले जाणार आहे.

त्यातून प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर पाणी मिळेल. सध्या दीडशे गावांमध्ये योजनेची कामे पूर्ण झाली आहेत. या महत्वकांक्षी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा खाली उतरणार असून दुष्काळातील त्यांची पाण्यासाठीची वणवण देखील थांबणार आहे.