मोठी बातमी! विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी…..

 मराठा आरक्षणाच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या 20 आणि 21 फेब्रुवारीला विधीमंडळाचं विशेष अधिवेशन असणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाचा कायदा होणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याआधी फडणवीस सरकारकडून एसीबीसीचं आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं होतं. त्याच्या तरतुदी या अधिवेशनात केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी विशेष अधिवेशन कधी बोलवणार? असा सवाल केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं आहे.

दोन दिवसांच्या अधिवेशानत महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे. येत्या 20 फेब्रुवारीला अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल अभिभाषण आणि शोक प्रस्ताव सादर होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 21 फेब्रुवारीला मराठा आरक्षण अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मनात आलं म्हणजे विधीमंडळाचं अधिवेशन घेता येत नाही”, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. “मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयानुसार 20 तारखेला अधिवेशन होणार आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. “जरांगेंवर नाराजी नाही. त्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी”, असंही उदय सामंत म्हणाले आहेत.