नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार!

2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय गणितं बदलली. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली. तेव्हापासूनच ही अनैसर्गिक युती असल्याचा विरोधकांकडून टीका केली जाते. उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येतील, अशीची चर्चा होत असते. यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्याने मोठा दावा केला आहे. 1 हजार टक्के नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणार, माझा अंदाज कधीही चुकणार नाही, असं शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं आहे.

एक हजार टक्के नरेंद्र मोदीसाहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत, असा माझा अंदाज आहे. हा अंदाज कधीही चुकणार नसल्याचं वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलं आहे. तसंच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे निवडणुकीतील सर्व्हे चुकीचे असल्याचं ते म्हणाले. मध्यप्रदेश ,राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हेदेखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा. हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असल्याचं आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. निवडणूक ही तुमच्या पाच वर्षाच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे सर्व्हे चुकीचे असतात. मध्यप्रदेश राजस्थान त्याचबरोबर बीआरएसचा सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा, हे ज्याचे त्याने ठरवायचं असतं. निवडणूक ही मताला जाता जाता सुद्धा मतपरिवर्तन करत असते, असं शहाजीबापू म्हणाले.