डाळींपाठोपाठ आता ‘या’ फळांच्या दरात मोठी वाढ

 सध्या महागाई नियंत्रित करण्यासाठी विविध प्रकारची धोरण सरकार आखत आहेच. मात्र, काही वस्तूंची महागाई काही कमी होताना दिसत नाही. महिनाभरात डाळींच्या किंमतीत मोठी वाढ झालीय. त्यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसतेय. डाळीच्या किंमतीबाबत बोलायचे झाले तर तुरीच्या डाळीच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या डाळींसह केळी , द्राक्षे , पपईच्या दरात मोठी वाढ झालीय. त्यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसतोय. डाळीबरोबरच द्राक्ष, सफरचंद, पपई आणि केळीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. द्राक्षाच्या दर हा 80 रुपये प्रतिकिलोवरुन 120 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला आहे. तब्बल किलोमागे द्राक्ष 40 रुपयांनी महाग झाली आहे.

तसेच पूर्वी पपई किंमतत ही 50 प्रतिकिलो होती, ती आता 90 रुपये किलोवर पोहोचली आहे. तर 50 रुपये डझनने मिळणारी केळी ही 70 ते 80 रुपयांवर गेली आहे. त्यामुळं सर्वसामान्यांचं बजट कोलमडल्याची चर्चा सुरु आहे.