देशातील जवळपास 13 कोटी शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर असताना ही गोड बातमी धडकेल. पीएम किसान योजनाचा 19 वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे. ही प्रतिक्षा संपणार आहे. या दिवशी 2000 रुपये खात्यात जमा झाल्याचा मॅसेज या कोट्यवधी शेतकऱ्यांना लवकरच येईल. पण त्याआधी हे काम करणे आवश्यक आहे. नाहीतर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही.
केंद्र सरकार या योजनेतंर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर दरवर्षी 6000 रुपये का आर्थिक लाभ देती है. देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. सरकार वर्षभरात तीनदा 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते जमा करण्यात आले आहे. आता 9 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. ही रक्कम याच महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. पण त्या आधी हे काम करावे लागेल. नाही तर योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहार दौऱ्यावर जात आहेत. ते 24 फेब्रुवारी रोजी शेतकर्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करतील. याविषयीची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. देशातील जवळपास 13 कोटी शेतकर्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल.
सरकारच्या गाईडलाईन्सचे पालन केले नाही तर 19 वा हप्ता खात्यात जमा होणार नाही. पीएम किसान योजनेतील लाभार्थी शेतकर्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. त्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.