breaking news या जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता

पुढील पाच दिवसात  विशेषतः कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यात तर मध्यम अवकाळी पाऊस व गारपीटीची शक्यतेची तीव्रता अधिक जाणवत असल्याचे माणिकराव खुळे म्हणाले.

मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार 16 मे पर्यंत सरासरी इतका म्हणजे 35 व 25 डिग्री से. ग्रेड दरम्यानचे कमाल व किमान तापमान राहणार आहे. तिथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस इत्यादी सारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नसून केवळ स्वच्छ उन्हाळी वातावरण जाणवेल.