प्लेऑफमध्ये आव्हान संपल्यानंतर विराट इमोशनल!

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं आयपीएल 2024 मधील आव्हान एलिमेटनर सामन्यात संपुष्टात आले. राजस्थानविरोधात आरसीबीला चार विकेटने पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा एकदा आयपीएल चषक जिंकण्याचं आरसीबीचं स्वप्न भंगलं. आयपीएल 2024 मधील  एलिमेनटर सामन्यातील पराभवानंतर विराट कोहली भावूक झाला होता. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांची जिद्द अन् आरसीबीचं कमबॅक याची चर्चा झालीच. पण पुन्हा एकदा आरसीबीचं चषक विजयाचं स्वप्न भंगलं. 

एलिमिनेटर सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, ” जेव्हा लागोपाठ पराभव होत होता, त्यावेळा खेळाडू निराश झाले होते.  पण मग आम्ही व्यक्त होऊ लागलो.सन्मानासाठी खेळायला सुरुवात केली, आमचा आत्मविश्वास परतला.” विराट कोहली पुढे म्हणाला की, आम्ही ज्या पद्धतीने कमबॅक केले.. सर्व खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. प्लेऑफसाठी क्वालिफाय केले, हे खास होतं. ही गोष्ट नेहमीच आठवणीत ठेवेण. कारण,टीममधील प्रत्येक सदस्याने यासाठी प्रचंड उत्साह दाखवला, मेहनत घेतली. आम्हाला याचा अभिमान वाटतो आणि शेवटी आम्ही जसं खेळायचं ते खेळलो.