वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी! धो धो पावसात…..

मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. धोधो पावसातही टीम इंडियाच्या विजयी रॅलीत सहभागी होण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले आहेत. वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले आहे. थोड्याच वेळात टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे.

टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय.रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.