भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगतच्या असेलेल्या जिल्यांमध्ये आज १४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये आज डोंगराळ भागात अति मुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अन्य भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातही घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा भागात १०० मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे.
Related Posts
जोतिबा देवांचे दर्शन नियमितपणे सुरु! मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलले….
वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचे संवर्धनाचे काम पुढे ढकलल्याने जोतिबा देवांचे दर्शन आजपासून नियमितपणे सुरु राहणार आहे.…
CM शिंदे अचानक कोल्हापूरला पोहोचले; गुप्त दौऱ्यात काय घडलं?
जरांगे पाटील यांच्याकडून मराठा आरक्षण प्रश्नावर सुरू असलेल्या उपोषणाचा फटका आता सर्व राजकीय नेत्यांना बसू लागला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही…
कोल्हापुरात अंगणवाडी सेविकांचा तावडे हॉटेल चौकात रास्ता रोको
अंगणवाडी सेविकांना दर महिना २६ हजार रुपये व मदतनीसांना २० हजार रूपये वेतन द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी दीड महिन्यांहून अधिक…