अंबानींच्या लग्नात ‘गुलाबी साडी’ गाण्यावर वऱ्हाडी थिरकले….

मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं,मालिका आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

जगभरात ज्या सोहळ्याची चर्चा झाली तो सोहळा पुन्हा एकदा विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने सिनेसृष्टीतल्या सगळ्यांनाच भुरळ घातली. अगदी माधुरीपासून ते अनेक दिग्गजांना या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. आता यातून अंबानी कुटुंब देखील सुटलेलं नाही. अनंत अंबानींच्या लग्नात थेट संजू राठोडने उपस्थिती लावली आणि अंबानी कुटुंबियांसह उपस्थितांनी गुलाबी साडी या गाण्यावर ठेका धरला. 

मागील अनेक दिवसांपासून एक लग्न आणि त्या लग्नामुळे बरीच मंडळी वारंवार चर्चेत येत आहेत. त्यातच उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे देखील काही मागे राहिले नाहीत. मित्राच्या संगीत सोहळ्यात बॉलीवूडकरांसह तेजस ठाकरे यांनी देखील ठेका धरला आणि त्यानंतर थेट सत्ताधाऱ्यांना राजकीय ठसकाच लागला. पण त्यातच आता तेजस ठाकरे यांनी पुन्हा एकदा ‘गुलाबी साडी’ या गाण्यावर मित्राची वरात गाजवली. 

मुंबईत सध्या एका राजेशाही सोहळ्याचे साक्षीदार अनेक दिग्गज होत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा लग्नसोहळा 12 जुलै रोजी पार पडला. रविवार 15 जुलै रोजी या सोहळ्याचा शेवटचा दिवस असून त्यांचे रिसेप्शन पार पडणार आहे. आतापर्यंत देशाच्या पंतप्रधानांसह ते जगभरातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली. विशेष म्हणजे या सोहळ्यात सुरांची जबाबदारी ही मराठमोळे गायक अजय-अतुल यांच्याकडे होती.