पुन्हा एकदा या तारखेपासून वाढणार महाराष्ट्रात पावसाचा जोर

भारतीय हवामान खात्याने पावसाबाबतचा एक नवीन अंदाज वर्तवला आहे. या नवीन अंदाजानुसार पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. खरे तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा मान्सून हा मजबूत असल्याचे जाणवत आहे.मान्सूनच्या अगदी सुरुवातीलाच महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला असता जून महिन्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी होते.

मात्र गेल्या वर्षाच्या मान्सूनसोबत तुलना केली तर यंदाच्या जून मध्ये देखील खूपच चांगला पाऊस झालाय. जुलै महिन्यात तर पावसाचा जोर खूपच वाढला होता. जून महिन्यात झालेल्या कमी पावसाची कसर जुलै महिन्यातून धरून निघाली असे आपण म्हणू शकतो.

राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाचा विसावा असेल. पण, शनिवारपासून राज्याच्या विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार हे तीन दिवस विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मात्र हे तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज दिला आहे.