आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघांमध्ये प्रत्येक पक्षाच्या जोरदार हालचाली, चर्चांना उधाण आलेले चित्र सध्या पहावयास मिळत आहे. अशातच आता प्रत्येक पक्षांच्या मतदार याद्या प्रसिद्ध होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाची उत्सुकताही शिगेला पोहोचलेली आहे. महायुतीकडून हातकणंगले विधानसभा मतदारसंघ हा जनसुराज्यसाठी सोडण्यात आला आणि डॉ. अशोकराव माने हे येथून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये दाखल झालेले भास्कर शेटे यांची मात्र मोठी कोंडी झालेली आहे. त्याचबरोबर निष्ठावंत गटही मोठ्या पेचात सापडला आहे. आता निवडणूक प्रचार दरम्यान शेटे आणि निष्ठावंत गट हे नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे.
Related Posts
पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आमदार शहाजीबापू पाटील यांचा विश्वास…..
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच शहाजीबापू पाटलांनी थेट पुढचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं असल्याचं सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ…
इस्लामपूरमध्ये जयंत पाटील यांचे वर्चस्व! महायुतीत इस्लामपूरची जागा कोणाला मिळणार?
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जयंत पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.…
सर्वात मोठी बातमी,राजकीय वर्तुळात खळबळ…..
राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती दिली आहे.…