बॅलेट पेपर नको फक्त ईव्हीएमवर मतदान घ्या; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतमध्ये ठराव

सध्या देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये चालू असलेल्या ईव्हीएम मशीनच्यासंदर्भात वेगवेगळे मतप्रवाह सुरु आहेत. याबाबत अनेक ठिकाणी विरोध दर्शवित तक्रारी सुरू आहेत.मात्र, पंढरपूर शहरालगत असलेल्या टाकळी ग्रामपंचायत सदस्यांकडून मात्र बैठकीत समर्थनार्थ एकमत झाल्याचे दिसून आले असून, याबाबतचा ठराव मंजूर करून घेण्यात आलेली राज्यातील पहिली ग्रामपंचायत लक्ष्मी टाकळी ठरली आहे.

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्याच्या बैठकीत ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ गुरुवार, १२ डिसेंबर रोजी एकमुखाने ठराव करून घेतला आहे. या ग्रामपंचायतमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता असून, या ठिकाणी शिंदेसेनेचे सरपंच संजय साठे व भाजपचे उपसरपंच संदीप सोनवणे, अशी महायुतीची सत्ता आहे. सध्या ईव्हीएम मशीनच्या संदर्भात चालू असलेले तक्रारीसंदर्भात राज्यामध्ये प्रथमच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतने ईव्हीएम मशीनच्या समर्थनाथ राज्यामध्ये पहिला ठराव एकमताने मंजूर केला आहे.