सांगोला तालुक्यातील १९ हजार ३३१ शेतकऱ्यांनी भरला पिक विमा

बदलत्या हवामानाचा शेतकऱ्यांना खूपच मोठा फटका बसतो आणि त्यांचे नुकसान देखील भरपूर प्रमाणात होते. शेतकरी अगदी काबाडकष्ट करून आपल्या शेतामध्ये शेती पिकवतात मात्र बदलत्या हवामानाचा तसेच अन्य कारणांमुळे शेतीचे मोठे नुकसान त्यांना सहन करावे लागते.

त्यामुळे शासनाकडून पिक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. याचा शेतकरी पुरेपूर फायदा देखील घेत आहेत.आसमान आणि नैसर्गिक संकट आल्यानंतर पिकांचे होणारे नुकसान यातून शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळावी म्हणून शासनाकडून पिक विमा जाहीर केला जातो. शेतातील पिकांचे नुकसान झाल्यानंतर त्यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. म्हणून पिक विम्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पीकविम्याबाबत शेतकऱ्यांमध्येअलीकडच्या काही काळात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. विम्यासाठी आता हप्ताही केवळ एक रुपया असल्यानेही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.या हंगामातील विम्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची तारीख होती. पण त्यानंतर ती एकदिवसाने वाढवून १६ डिसेंबरपर्यंत केली होती.

या दिवसअखेर जिल्ह्यात ९५ हजार १२४ शेतकऱ्यांनी १ लाख ४३ हजार ८६० हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा उतरला आहे. त्यामध्ये सांगोल्यातून १९ हजार ३३१, बार्शी तालुक्यात सर्वाधिक २३ हजार ५७३ शेतकऱ्यांनी, त्यानंतर माढ्यातून १५ हजार ९९० शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. तर सर्वांत कमी पंढरपूर तालुक्यातून केवळ ८९९ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे.|