गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील थंडीचे प्रमाण काहीसे कमी झाले असून काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्यात जसा पाऊस झाला तसाच अवकाळी पाऊस पुन्हा हजेरी लावणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान भारतीय हवामान खात्यातील काही तज्ञांनी आगामी काही दिवस राज्यातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी देखील 15 16 आणि 17 जानेवारीला महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार असा अंदाज दिला आहे. डख यांनी आपल्या नवीन अंदाजात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 17 जानेवारीपर्यंत राज्यात ढगाळ हवामान राहील असं सांगितलं. तसेच त्यांनी चाळीसगाव व आजूबाजूच्या भागात कुठेतरी हलका पाऊस होईल आणि लातूर व सोलापूर या भागाकडे सुद्धा हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज यावेळी वर्तवला आहे.
पण महाराष्ट्रात फार मोठा पाऊस काही पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाहीये असे देखील त्यांनी आपल्या या हवामान अंदाजात स्पष्ट केले आहे.पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टी या भागात पुढील तीन दिवस फक्त आणि फक्त ढगाळ हवामानाची शक्यता आहे. राज्यात कुठेच मोठा पाऊस पडणार नाही यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.
फक्त चाळीसगाव, लातूर व सोलापूर या भागाकडे थोडासा हलका पाऊस राहू शकतो असे पंजाबरावांनी सांगितले आहे.