राज्यातील बहुचर्चित पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर झाले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक बदल केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वात संवेदनशील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारले आहे. गडचिरोलीत बदल घडवण्याच्या निर्धाराने काम सुरु केलेले देवेंद्र फडणवीस यांनी त्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले आहे. तसेच तीन जिल्ह्यांत दोन पालकमंत्री नेमण्याची वेगळा प्रकार यावेळी घडला आहे.
तीन जिल्ह्यांत सहपालकमंत्री असणार आहे. कोल्हापूरमध्ये दोन पालकमंत्री करण्यात आले आहे. हसन मुश्रीफ ऐवजी प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ यांना ही जबाबदारी दिली आहे. हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमचे पालकत्व दिले आहे. मुंबई उपनगरची जबाबदारी आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली आहे. रायगडमध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात स्पर्धा होती. परंतु त्या ठिकाणी आदिती तटकरे यांना रायगडची जबाबदारी दिली आहे.
एकनाथ शिंदे, अजित पवार आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांच्याकडे दोन जिल्हे दिले आहेत. एकनाथ शिंदे यांना ठाणे सोबत मुंबईची जबाबदारी दिली आहे. तसेच अजित पवार यांनाही बीड आणि पुणे जिल्हा दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती जिल्हा दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यात कोण पालकमंत्री
- गडचिरोली – देवेंद्र फडणवीस, सहपालकमंत्री आशिष जयस्वाल
- नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
- अमरावती- चंद्रशेखर बावनकुळे
- ठाणे – एकनाथ शिंदे
- मुंबई शहर- एकनाथ शिंदे
- पुणे – अजित पवार
- बीड – अजित पवार
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे
- अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील
- वाशिम – हसन मुश्रीफ
- सांगली – चंद्रकांत पाटील
- सातारा -शंभुराजे देसाई
- छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट
- जळगाव – गुलाबराव पाटील
- यवतमाळ – संजय राठोड
- कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ
- अकोला – आकाश फुंडकर
- भंडारा – संजय सावकारे
- बुलढाणा – मकरंद जाधव
- चंद्रपूर – अशोक ऊईके
- धाराशीव – प्रताप सरनाईक
- धुळे – जयकुमार रावल
- गोंदिया – बाबासाहेब पाटील
- हिंगोली – नरहरी झिरवळ
- लातूर – शिवेंद्रसिंग भोसले
- मुंबई शहर – एकनाथ शिंदे
- मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा
- नांदेड – अतुल सावे
- नंदुरबार – माणिकराव कोकाटे
- नाशिक – गिरीष महाजन
- पालघर – गणेश नाईक
- परभणी – मेघना बोर्डीकर
- रायगड – अदिती तटकरे
- सिंधुदुर्ग- नितेश राणे
- रत्नागिरी – उदय सामंत
- सोलापूर – जयकुमार गोरे
- वर्धा – पंकज भोयर
- जालना – पंकजा मुंडे