वाहतुकीची समस्या हि प्रत्येक भागात पहायला सर्वाना सऱ्हास मिळतेच. इचलकरंजी शहरातील अंतर्गत वाहतुकीचा विषय नेहमी चर्चेत असतो. शहरात दुचाकी, तीनचाकी, वाहनाची संख्या लक्षणीय आहे. त्या मानाने शहरातील रस्ते दिवसेंदिवस अरूंद होत चालले आहेत. शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी महानगरपालिक प्रशासन आणि शहर वाहतूक नियंत्रण कक्षाच्यावतीने विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये मुख्य रस्त्यांवर पट्टे मारणे, तो पार्किंग, सम-विषम तारखेला पार्किंग, नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई आदी वाहतूक शाखेकडून केले आहे.
तसेच शहरात के. एल मलाबादे चौक, श्री शिवतीर्थ, छ. शाहु पुतळा, डेक्कन चौक, थोरात चौक, नवीन महानगरपालिका चौका आदी ठिकाणी सिग्रल व्यवस्था लावण्यात आली आहे. बऱ्याच सिग्रल व्यवस्थेच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतो. त्याचा गैरफायदा घेत काही अतिउत्साही वाहनधारक हिरवा सिग्रल लागण्यापूर्वीच सुसाट वेगाने वाहन चालताना दिसतात. अशा प्रकारामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
शहरातील सिग्रलबाबत वाहनधारकांची बेफिकीरीपणा वाढल्याने त्याचा नाहक त्रास इतर वाहनधारकांना होत आहे. तेव्हा शहरातील विविध सिग्रल परिसरात वाहतूक पोलिस तैनात करून नियम तोडणाऱ्या कडक कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली. आहे. तसेच वाहनधारकांनीही नो पार्किंगमध्ये लावलेल्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामध्ये नो पार्किंग मधून वाहन उचलून कारवाई केली जाते. वाहतूक शाखेकडून केवळ क्रेनच्या सहाय्याने वाहने उचलण्याशिवाय कोणतेही उपाय योजले जात नसल्याचा आरोप वाहनधारकांतून केला जात आहे.
इचलकरंजी शहरातील अंतर्गत वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने शहरातील विविध चौकांमध्ये सिग्नल व्यवस्था बसविण्यात आली आहे. त्याचबरोबर ऐकरी मार्ग, नो पार्किंग, सम-विषम तारखेला पार्किंग आदी उपाय योजना राबविल्या आहेत. मात्र, शहरात विविध चौकांमध्ये लावण्यात आलेल्या सिग्नलबाबत वाहनधारकांचा बेफिकीरीपणा वाढत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये अनेक वाहन चालक सिग्नल तोडून जाणाऱ्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. तेव्हा वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.