Maharashtra Cabinet: मंत्रिमंडळाच्या बैठकीत 3 मोठे निर्णय…..

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे तीन निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पुण्यातील टेमघर प्रकल्पाला विकासकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसंच, अभय योजनेचा कालावधी एका वर्षासाठी वाढण्यात आला आहे.

टेमघर प्रकल्पाला निधी

पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाच्या (ता. मुळशी) गळती प्रतिबंधक उपाययोजनेची उर्वरित कामे व धरण मजबुतीकरणाच्या कामांसाठी 315 कोटी 5 लाख रूपयांच्या खर्चास विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्यासाठी निधी

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व जावळी तालुक्यातील कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या 25 प्रकल्पांसाठी 170 कोटी रूपयांच्या तरतूदीस विशेष बाब म्हणून प्रशासकीय मान्यता.

अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ

शेती, अकृषिक, निवासी, वाणिज्यिक अथवा औद्योगिक प्रयोजनासाठी तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना भाडेपट्टयाने किंवा कब्जेहक्काने दिलेल्या शासकीय भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनी भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करताना कमी अधिमूल्य आकारण्याच्या अभय योजनेस एक वर्षांची मुदत वाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.