उद्धव ठाकरे-भाजप पुन्हा एकत्र येणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

[विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) अनेक नेते महायुतीमध्ये (Mahayuti) जाताना दिसत आहे. तर दुसरीकडे गेल्याकाही दिवसांपासुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) नाराज असल्याने भाजप ( BJP ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खरंच भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मुलाखातीत बोलताना महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती नाही. संवाद करायला. बोलायला काही अडचण नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीनंतर सार्वजनिक ठिकाणी भेट झाली आहे पण त्या व्यतिरिक्त कुठेही आमची भेट झाली नाही. आमच्यातील संबंध कधीच असे नव्हते की, समोर भेटल्यानंतर नमस्कार करणार नाही. आम्ही समोरासमोर भेटतो, नमस्कार करतो, दोन चांगल्या गोष्टी बोलतो. आमच्याच संबंध आहेच. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी राजकीय परिस्थिती नाही. संवाद करायला आणि बोलायला काहीच अडचण नाही. पण भेटलो की लगेच माध्यमांत चर्चा होते. असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.