सांगोला तालुक्याचे नूतन आमदार यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न चालू केलेले आहेत. विकासकामांच्या दृष्टीने ते पाऊल टाकीत आहेत. आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार देखील होत आहे. लोकप्रिय आमदार डॉ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी बचत भवन सांगोला येथे झालेल्या बैठकीमध्ये टेंभु योजने आवर्तन सोडणे कसे गरजेचे आहे. ते पाणी ताबडतोब सोडले पाहीजे अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखवत पाणी सोडले. सध्या हे पाणी गळवेवाडी बंधारा,आवळाई बंधारा, विठलापुर दोन बंधारे, भरुन पुढे खवासपुर येथे मान नदीत पाणी येणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आनंदी झाला असुन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या कामाचे कौतुक करु लागला आहे