SBI Scheme: स्टेट बँकेची ४०० दिवसांची खास योजना! करा एकदा गुंतवणूक मिळणार ७.६० टक्के परतावा……

अनेकजण आपल्या कुटुंबाच्या उत्तम भविष्यासाठी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करतात. एफडीत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला लाँग टर्म फायदा मिळतो. त्यामुळे अनेकजण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करतात.एफडीतील गुंतवणूक ही सुरक्षित असते. या योजनेत परतावा मिळतो. देशातील अनेक बँका एफडीवर चांगले व्याजदरदेखील देतात. जर तुम्हीही एफडीत गुंतवणूक करायचा विचार करत असाल तर स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेत गुंतवणूक करा.

स्टेट बँकेच्या अमृत कलश योजनेत कमीत कमी दिवसात चांगला परतावा मिळतो. ही योजना ४०० दिवसांची आहे. या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे.

या योजनेत तुम्हाला फक्त ४०० दिवसांसाठी गुंतवणूक करायची आहे. या योजनेत सर्वसामान्य नागरिकांसाठी ७.१० टक्के व्याजदर दिले जाणार आहे. ज्ये्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळते. ही योजना सुरक्षित आहे. या योजनेत तुम्ही लवकरात लवकर गुंतवणूक करा.

अमृत कलश योजनेत भारतीय आणि एनआरआय दोघेही अर्ज करु शकतात. या योजनेत डिपॉझिट आणि रिन्यू अशा योजनांचा समावेश आहे. या योजनेत २ कोटींपेक्षा कमी गुंतवणूकीवर टर्म डिपॉझिट लागू आहे.

या योजनेत महिन्याला, तिमाही आणि सहा महिन्यांच्या आधारे व्याजदर दिले जाते. टर्म डिपॉझिटमध्ये मॅच्युरिटीच्या वेळी व्याजदर दिले जातात. या योजनेत टीडीएस कापला जातो. त्यामुळे तुम्हाला टीडीएसमधून सूट हवी असेल तर फॉर्म 15G/15H भरावा लागेल. तसंच या योजनेत लोन सुविधादेखील मिळते. या योजनेत तुम्ही स्टेट बँकेत जाऊन अर्ज करु शकतात.