दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी! महाराष्ट्रात इतक्या जागांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हि खूपच महत्त्वाची बातमी आहे. बेरोजगारीच्या काळात ही भरती तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ही भरती संपूर्ण देशभरात राबवली जाणार आहे. महाराष्ट्रात सुमारे १५०० जागा भरल्या जाणार आहेत. भारतीय टपाल विभागात लवकरच मोठी भरती होणार आहे. या मेगाभरतीमध्ये विविध पदांचा समावेश आहे.

पदे

उपोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक

तब्बल २१,४१३ जागा भरल्या जाणार

वयोमर्यादा

उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे पूर्ण आणि कमाल ४० वर्षांपर्यंत असावे. आरक्षित वर्गाला नियमानुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

एससी/एसटी उमेदवारांसाठी ५ वर्षांची, ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची, तर दिव्यांग उमेदवारांसाठी १० वर्षांची सूट

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवार ३ ते २८ मार्चपर्यंत अर्ज करू शकतात.

अर्ज करण्याची प्रक्रिया

उमेदवार टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन (Online) आहे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषय अनिवार्य आहेत. उमेदवारांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असून, संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.

निवड

उमेदवारांची निवड गुणवत्तेवर आधारित असेल आणि कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.