उन्हाळ्याची तीव्रता वाढत चालली असून इचलकरंजी शहरास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नदी पात्रातील पाणी पातळी कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेकडून होणारा पाणी उपसावर त्याचा काही अंशी परिणाम झाल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. इचलकरंजी शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेवून शहराला समान प्रमाणात आणि एकदिवस आड पाणी पुरवठा होण्याबाबत काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे आदेश आयुक्त पल्लवी पाटील यांनी पाणी पुरवठा विभागास दिले. तर सम प्रमाणात पाणी पुरवठा करत असताना कोणत्याही प्रकारच्या दबावास बळी पडू नये असे सांगत जर असे प्रकार घडल्यास ते आपल्या निदर्शनास आणून द्यावेत.
आपण खंबीरपणे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.या संदर्भात विविध माध्यमांद्वारे प्राप्त होत असलेल्या तक्रारी निदर्शनास आल्याने आयुक्त पल्लवी पाटील यांनी तातडीने पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांच्या समवेत बैठक घेतली. बैठकीत अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील पाणी पुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा पुरवठ्याच्या नियोजनाचा आढावा घेवून संपूर्ण शहरात सम प्रमाणात आणि एक दिवस आड पाणी पुरवठा होण्यासाठी काटेकोर नियोजन करणेचे आदेश दिले.
त्याचबरोबर एखाद्या भागात पाणी पुरवठा होत असलेल्या दोन पाईप लाईन असतील तर त्यापैकी एक पाइप लाईन बंद करणेच्या सुचना दिल्या. बैठकीस प्र. कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, शाखा अभियंता बाजी कांबळे यांचे सह पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तसेच विविध प्रभागातील पाणी सोडणारे कर्मचारी उपस्थित होते.